Tuesday, 4 July 2017

shiva shinde sir

1). जगातील सर्वात उंचावरील रेल्वे मार्गासाठी भारतीय रेल्वे सर्वेक्षणाचे काम हाती घेणार असून हा रेल्वे मार्ग हिमाचल प्रदेश ते जम्मू काश्मीर मधील कोणत्या दोन शहराला जोडला जाणार आहे. ? A). मनाली ते श्रीनगर B). शिमला ते लेह C). मनाली ते लेह D). शिमला ते अनंतनाग Correct Ans: (C) 2). भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे देशातील पहिले तर जगातील ५७ वे सर्वांत महागडे शहर ठरले असल्याची माहिती मर्सर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. कोणते शहर या यादीत जगातील सर्वांत महागडे शहर ठरले आहे.? A). सिंगापूर B). दुबई C). न्यूयॉर्क D). ल्युएण्डा Correct Ans: (D) 3). युवकांना कुशल बनवणे आणि यातून त्यांना रोजगार मिळवणे सुलभ होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी कौशल भारत मिशन अंतर्गत भारतातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणासाठी जागतिक बँकेने किती कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.? A). ५ कोटी डॉलर्स B). १० कोटी डॉलर्स C). २५ कोटी डॉलर्स D). ५० कोटी डॉलर्स Correct Ans: (C) 4). पाहिजे तेव्हा आणि हवे तेथे रोख रक्कम काढण्याचा अत्यंत सोपा पर्याय म्हणजे एटीएम होय,जगातील पहिले एटीएम लंडनमध्ये कोणत्या बँकेने सुरू केले होते.? A). एच एस बी सी बँक B). बार्कलेज बँक C). रॉयल बँक D). लॉईड बँक Correct Ans: (B) 5). नुकतेच एम जी के मेनन यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? A). प्रशासन B). साहित्य C). विज्ञान D). चित्रपट Correct Ans: (C) Description: ते भारताचे वरिष्ठ वैज्ञानिक असून २८ ऑगस्ट १९२८ साली त्यांचा जन्म मंगलोर येथे झाला होता. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संशोधन मंडळ ( इस्रो ) येथे ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांचे नाव एम.गोविंद कुमार मेनन होते. 6).राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० वर्षे करण्यासाठी राज्य शासनाने कोणती समिती नेमली आहे? A). के.पी. बक्षी समिती B). जे.पी. डांगे समिती C). अरविंद कुमार समिती D). बी.सी. खटुआ समिती Correct Ans: (D) Description: राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या संदर्भात अखिल भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. 7).संपूर्ण राज्यासाठी कोणत्या ठिकाणी मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. ? A). औरंगाबाद B). नागपूर C). पुणे D). ओरोसबुद्रुक Correct Ans: (A) Description: संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. 8).जगातील सर्वात जास्त स्थलांतर पुढीलपैकी कोणत्या देशात होते.? A). भारत B). चीन C). अमेरीका D). रशिया Correct Ans: (C) Description: भारतात स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त आहे..साधारणतः दिड कोटी लोकांनी २०१५ साली स्थलांतर केले.परंतू याच काळात अमेरिकेत सर्वात जास्त साडे चार कोटी लोकांनी स्थलांतर केले. ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेची स्थापना कधी झाली..? A). २००९ B). २०१० C). २०१२ D). २०१६ Correct Ans: (B) Description: ग्रीन क्लायमेट फंड या संस्थेचे मुख्यालय दक्षिण कोरीयातील इंचेआँन जिल्ह्यातील सोंगडो या शहरात आहे, या संस्थेची स्थापना २०१० साली झाली. 10).जुलै २०१६ पर्यंत भारतातील किती जागतिक वारसा स्थळांना UNESCO ने मान्यता दिली आहे.? A). ४१ B). ३७ C). ४७ D). ३५ Correct Ans: (D) Description: जुलै २०१६ पर्यंत भारतातील ३५ जागतिक वारसा स्थळांना UNESCO ने मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने पश्चिम घाट व हिमालय यातील प्रमुख ठिकाणं आहेत *JP...* २०१६ मध्ये मर्सर या संस्थेने २३० शहरांचा अभ्यास करून जाहीर केलेले जगातील सुंदर शहर कोणते ? A). जिनिव्हा B). व्हिएन्ना C). लॉस एंजेलिस D). सेंट पिटर्सबर्ग Correct Ans: (B) Description: 'मर्सर' या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून, २३० शहरांचा अभ्यास केला गेला आहे. ‘मर्सर’ या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वांत सुंदर शहर व्हीएन्ना आहे. दहशतवादाने पोखरलेली इराकची राजधानी बगदाद हे या यादीत सर्वांत शेवटी आहे. हि यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्य सुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले गेले.

1 comment: